Friday, 10 April 2020

माझी घर खरेदी... भाग २ ..

एक आठवण एक साठवण..

माझी घर खरेदी... भाग २ ..

अनुभव - शब्दांकन 

नंदा प्रभुदेसाई 

असा हा माझा आत्तापर्यंत चा तिसरा व बाळाचा पहिला प्रयत्न अक्षरशः तोंडघाशी पडता पडता आम्ही वाचलो होतो.

आम्ही दोघे रोज सकाळ - संध्याकाळ 7 नंबरच्या ग्राउंडवर Badminton व रिंग खेळायचो. त्यामुळे एक गोष्ट चांगली व्हायची म्हणजे आमच्या सगळ्या अपयशावर खेळ हा उतारा असायचा, अगदी काहीही घडलं तरी खेळाच्या या नादामुळे आम्हीं ते विसरून जायचो.

रिंग खेळताना आज लवकर थांबायचं हं आपणाला साईट बघायला जायचय कांदिवलीला अशी आपलीच खिल्ली उडवायचो ...

आता आमची दोघांचीही वय लग्न करण्या इतपत झाली होती पण आपल्याला घर नाही त्यामुळे आपल्याला कोणी मुलगी हो म्हणणं शक्य नाही अशी आमची खात्री झाली होती . त्यातच केलेले प्रयत्न जर कुणाला सांगावे तर तुम्हीच कर्मदरिद्री याशिवाय चांगली उपाधी आमच्यासाठी नव्हती .

आपण love marriage करायला पाहिजे होतं ,  असा पण विचार करून आम्ही पाहिला होता त्यावेळी. पण आपलं नशीब आणि दैव प्रत्येकवेळी आडवं यायचं.

असच एकदा पारल्याचे प्रसिद्ध बिल्डर्स परांजपे विरार ला जागा बांधतायत अस कळलं .

इतकेवेळा प्रयत्न करून सुदधा जरी जमलं नसलं तरी सुदधा पुन्हा पररांजपयाकडे जागेसाठी लाईन लावायला मी तयार. कारण नर्लज्जपणा, कोडगेपणा दुसरं काय !!


पण यावेळी builder चांगले असल्यामुळे  मी , श्री. भाउ हर्डीकर आणि रामानंद मधील बहुतेक जण परांजपयांच्या ऑफिस समोर लायनीत उभे होतो. पैसे 5000 भरून फक्त बुकिंग करायचं म्हणजे तस काम सोपं इतरांसाठी होतं, माझ्याकडे 5000 ची पण बोंब च होती. 
काहीतरी साठवगाठव केली , बॅँक अकाउंट बंद केलं व शेवटचे 100 रुपये पण घेतले आणि एकदाचे 5000 भरले. ती receipt चांगली प्लास्टिकच्या फोल्डर मध्ये घालून,आपल्याला कोणी बघत तर नाहीना अशावेळी पार्लेश्वराच्या देवळात जाऊन देवांसमोर  ठेवली व " बाबारे , आता तरी मला मदत कर " असं सांगितलं...


मी पहिल्याने मला Double रूम घ्यायला जमेल,  म्हणजे 25000 त काम होणार होतं....

पण नंतर राजामामा ने माझं बौद्धिक घेतलं व 1BHK , 55000 मध्ये घ्यायचं ठरलं. पाच हजारांचा हप्ता होता. 
आता बुकिंगनंतर allotment चा दिवस उजाडला. राजा मामाने सर्व जागांचा व्यवस्थित स्टडी करून कॉर्नरच्या जागा कोणत्या अस सगळं शॉर्टलिस्ट केलं होतं, श्री च्या नंतरचा नंबर माझा , त्यामुळे त्याने select करून झाल्यावर जी उरली ती मला, अशी ऑलॉटमेंट झाली.....

मध्यंतरी खूप उलाढाली झाल्या व 1987 साली अनंत प्रभुदेसाई 1 BHK जागेचे मालक झाले.

1978 ते 1987 या 10 वर्षात कीत्येक प्रयत्न मनस्ताप पचवून शेवटी एका जागेवर माझं नाव लागलं....

1988 साली माझं लग्न झालं व आम्ही विरारला राहायला आलो . अजूनही माझ्या नशिबाची थट्टा संपली नव्हतीच ....

अनुजाच ऑफिस CST ला , माझं अंधेरीला,  त्यामुळे ती दादरला गाडी बदलून जी  विरार गाडी पकडायची तीच मी अंधेरीला पकडायचो व विरारला पोचेपर्यंत आम्हाला ब्रह्मांड आठवायचं !!! ...

कसबस एक वर्ष आम्ही काढलं व विरारला राहणं शक्य नाही हे जाणवलं, त्यामुळे पुन्हा नव्या दमाने घर शोधण्याची मोहीम सुरू झाली . आता फरक इतकाच माझ्याबरोबर आणखी एक हक्काचा पार्टनर मिळाला ....

मधल्या काळात आपण विरारला एक दुकान घेऊया अस मी अनुजाला सांगीतल्यावर 
"ना आपल्याला रहायला धड घर आणि दुकान कसलं घेता "
आणि हा विषय इथेच थांबला .

1988 चा डिसेंबर महिना  उजाडला. ठाण्याला सद्गुरू सोसायटी मध्ये 1BHK जागा घ्यायचं आम्ही ठरवलं. किंमत 
रु. 250,000/- . आमचं saving रु. 20000/- होतं , आता हे सगळं कसं जमवायचं ?

यावेळी एक जमेचीबाजू म्हणजे विरारची जागा विकता येणार होती.पण ती घेणार कोण?  कारण सोसायटी च झाली नव्हती , त्यामुळे तेंही शक्य नव्हतं.


जे सर्व सामान्यांना सहज शक्य असतं ते मी करायला गेलो की त्यात अनेक भानगडी आणि नाना विघ्न उत्पन्न झाली नाहीत , अशी कोणतीच गोष्ट माझ्या नशिबी नव्हती....


आता मी पहिली नोकरी सोडून Raptakos Brett , वरळीला जॉईन झालो होतो. त्यामुळे नवीन नोकरी सांभाळणे आणि नवीन घर पण घेणे या कात्रीत सापडलो.

असलेल्या वीस पैकी दहा हजार देऊन जागा बुक केली आणि नवीन मनस्ताप विकत घेतला. 

आता loan घ्यायचं HDFC च , म्हणून वीरार ते वरळी ऑफिस , ते परेल HDFC आणि ठाणे  व परत घरी विरार , अशी अर्धी मुंबई पालथी घालणं सुरू झालं.
या वेळी दिलिप ने एक अतिशय चांगली गोष्ट केली म्हणजे HDFC मध्ये मोठ्या पोस्टवर असणाऱ्या रेखा व्यास ह्यांना लेटर लिहून मला मदत करण्यविषयी सांगितलं . 
आमचे दोघांचे पगार, LIC policies आणखी अस जे काय होतं ते सर्व pledge करून सुद्धा आम्हाला रु. 110000च लोन sanction झालं. रिपेमेंटचा विचार न करता आता उरलेले 140000 कसे जमवायचे हा एकच ध्यास होता.
जे देणारे होते त्याच्याकडून घेऊन सुद्धा भर पूरी होईना, व बिल्डरने तगादा लावला उरलेले पैसे भरा नाहीतर जागा मला दुसऱ्या पार्टीला  वीकावी लागेल . लोन सोडून बाकीचे पैसे देत नाही तोर्यंत agreement नाही , आणि agreement नसेल तर लोनची disbursement नाही , जी सॅन्गशन  झाल्यापासून 25 दिवसात घ्यायची होती. अशा वीचित्र परिस्थितीत सापडलो आणि काहीही सुचेना.

दैव खडतर होतं पण नशिबाने अजूनतरी पाठ फिरवली नव्हती.

एक दिवस Paranjape Builders च्या ऑफिस मधून कदम यांचा फोन आला व तुम्ही आत्ता लगेचच इथे या अस सांगितलं.


कदम म्हणाले तुम्हाला विरारची जागा विकायची आहे ना,  ती हे कुलकर्णी घ्यायला तयार आहेत . पण त्यांच्या काही अटी आहेत , त्या ते सांगतील...
कुलकर्णी म्हणाले ..

1) आत्ता लगेचच तुम्ही मला जागेच पझेशन दिल तर मी तुम्हाला रु. 40000 देईन.

2) एक महिन्यानंतर रु.35000 देईन.

3) उरलेले 35000 एक वर्षांनंतर देईन.

कदम (जयंत परांजपे यांच्या ऑफीसमधील स्टाफ ) म्हणाले सोसायटी registration यांच्या नावाने करण्याची जवाबदारी माझी. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती.मी ह्या proposal ला हो म्हणालो. पण हा व्यवहार जेव्हा माझे काका , दादा यांना सांगितला तेव्हा त्यांनी मला फक्त मूर्खात नाही काढलं तर तूझी जागा हा माणूस 40000 ना घेतोय , नंतरचा व्यवहार पूर्ण होईल याची काय खात्री ? ना तुला ही नवीन जागा मिळेल व विरारची घालवुन बसशील , लकशात ठेव ......

त्या सर्वांचं म्हणणं बरोबर होतं , मला पटतही होतं पण माझ्याकडेही दुसरा कोणताही पर्याय नव्हता .
 
मी घरी अनुजाला सांगितलं व आपण मोठी रिस्क घेतोय कदाचित रस्त्यावर येऊ , पण मला माझं मन सांगतंय आपण निभावून जाऊ , सांग तुला काय वाटतं....

"तुम्हाला करायचं आहे ना,  मग कुणालाही विचारत बसू नका , बघू काय नशिबात असेल ते  होईल .. .."

मी एक विचार केला कुलकरण्यांनी जरी 75000 दिले तरी आपण ही जागा घेऊ व नंतर एक वर्षानंतरचे 35000 नाही दिलें तर त्यावेळी जे सुचेल ते करू.

मी साधं गणित मांडलं आपल्याकडचे 20000 ,75000 कुलकर्णी देणार , 20000 पगार वगैरे जमा होईल  व 25000 दादा कडून घेऊ , झाले 140000 .

पुढंचया एक महिन्यात झोप येत नव्हती . मी ओळखीच्या खूप लोकांकडून एक महिन्याच्या बोलीने पैसे गोळा केले व बिल्डरला दिले. यथावकाश लोन चा चेक पण मिळाला तो बिल्डरला दिला तर म्हणे जोपर्यंत चेक वठत नाही तोर्यंत ताबा मिळणार नाही . मी कसं बस त्यांना पटवून दिलं, चेक HDFC चा आहे वगैरे ...
आणि ब्लॉकची किल्ली मिळवली.


December 1988 मध्ये 
सद्गुरू सोसायटी , बिल्डिंग H,  Block No 28  वर  
ANANT PRABHUDESAI  &
ANUJA PRABHUDESAI 
अशी पाटी दिमाखात झळकली होती .

ठरल्याप्रमाणे कुलकर्णी यांनी 75000 दिले ,  एका महिन्याच्या आत ज्याचे घेतले होते ते सर्व परत दिलें.
आशा प्रकारे आम्ही ठाण्यात प्रवेश केला.
  
हे घर विरारच्या मानाने खुप चांगलं होतं , अनुजासुदधा ठाणेकरच असल्यामुळे आमचा जम लवकरच बसला.

इथे मंडळी तुम्हाला सांगतो नन्तर परांजपे , स्थानिक लोक यांच्यांत विरारला काहीतरी लीगल इशू झाले व फेज 2 च प्रोजेक्ट वेळेवर झालं नाही .
ईथुन सगळ्यात पहिल्याने जागा विकून , तीसुद्धा इतक्या रिस्क घेऊन बाहेर पडणारा मी होतो . अजूनही लोकांचे पैसे इथे अडकलेले आहेत . बर मी कुलकर्णी याना फसवलं होत का ?  नाही !!!    इतकच काय एक वर्षा नंतरचे द्यायचे पैसे त्यांनी मला ठाण्याच्या घरी स्वतः आणून दिले व तुम्ही आम्हाला विश्वास ठेवून मदत केलीत म्हणून आमचं घर तरी झालं , अस सांगितलं. या 35000 पैकी , 5000 कुलकर्णीना आनंदाने परत दिले व आपणा दोघानाही गरज होती , तूम्ही खुश तर मीही खुश अस सांगितलं ...

1993 साल उजाडलं आणि अनुजा म्हणाली , मला BPCL मध्ये पाच वर्षं झाली त्यामुळे मला घर घेण्यासाठी लोन मिळेल.

आत्तापर्यंतचे अनुभव बघून मी म्हणालो आहे हे घर ठीक आहे, आपण HDFC च लोन परत करूया.

8-10 दिवस विचार करण्यातच घालवले .

.......... २ .....

......... क्रमशः .......

No comments:

Post a Comment