Sunday, 8 October 2023

सख्याहरी

सख्याहरी

लेखन, शब्दांकन 
अनंत (नंदा) प्रभुदेसाई
21 डिसेंबर 2022

मंडळी तळवडे गाव हा अर्जुना नदीच्या काठी वसलेला निसर्गाचे लय लूट असलेला असा सुंदरसा गाव . या गावांमध्ये अत्यंत कलाप्रेमी जसे लोक होते तसेच काहीसे विचित्र लोक पण होऊन गेले .
गावची एक विशिष्ट अशी पद्धत होती ज्याचं नाव वासूदेव असेल त्याला वाश्या, राम नाव असेल तर राम्या , सखाराम असं व्यवस्थित नावाच्या माणसाला सख्या असे म्हणण्याची पद्धत होती . त्याचं ना त्या माणसाला काही वाटायचं , तर ना हाक मारणाऱ्याला ....

आता हाच माणूस बघा ना याचे केस वाढलेले आणि राकट दाढी मिशा वाढलेल्या, अंगात कब्जा म्हणजे बंडी, त्याला वरच्या बटणाच्या ठिकाणी दोरी बांधलेली इतर बटणांचा पत्ताच नाही, खाली पंचा गुंडाळेला कींवा मळकी चड्डी हा झाला त्याचा वेश परंतु वैशिष्ट्य असं याच्या खांद्यावरती दोन तीन मोठी गाठोडी व दुसऱ्या खांद्यावरती तशीच पण थोडी आकाराने लहान असे तीन-चार गाठोडीअसायची.घामाने तेलकट झालेली , ती सुद्धा एकमेकांमध्ये बांधलेली असायची, तो जेव्हा दिसायचा तेव्हा ही गाठोडी खाद्यावरती घेऊन त्यांच्या वजनाने थोडा वाकलेला, तीन-चार दिवसात आंघोळ न केलेला असा तो फिरत असायचा...
मंडळी अशा ह्या माणसाला सख्याहरी असं म्हणत , भले त्याचं नाव सखाराम रबशे असं होतं हे मला ऐकून माहिती होतं.....
आता ही गाठोडी त्यात काय असेल हे एक मोठं कोडंच होत , कारण त्याने स्वतःही कित्येक दिवसात ती सोडून पाहिली नव्हती. लोक म्हणत त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळचे पैसे आहेत ,चांदीची नाणी आहेत, सोन्याची सुद्धा असू शकतात ...कोणालाच काही नक्की माहित नव्हतं.....
आता हा माणूस 
रात्री राहतो कुठे ?
खातो काय ?
जगतो कसा?
हेही आम्हा मुलांना माहीत नव्हतं....
एक मात्र नक्की होतं. दुपारच्या जेवणाच्या अगोदर म्हणजे साधारणपणे दीड दोन वाजता ही स्वारी आमच्या घरी यायची. तसं आमचं घर ऐस पैस असल्यामुळे आणि त्या त्याच्या गाठोड्यांना कोणीही हात लावणार नाही याची खात्री असल्यामुळे बाहेरच्या पडवीत गाठोडी ठेवून तो अर्धा तास चक्क झोपायचा. जाग आल्यावर आम्ही मुलं त्याला विचारायचो...
सख्या, या गाठोड्यात काय आहे रे , जरा उघडून दाखव ना.... 
तो शून्य नजरेने आमच्याकडे पाहायचा....
आणि विचित्र हसायचा...
तोंडाने काहीतरी पुटपुटायचा...

"सख्या,अरे ही गाठोडी कोणीतरी घेऊन जाईल एक दिवस " 
असं आमचे काकालोक त्यांला सांगायचे . या सगळ्या बोलण्याचा त्याच्यावर बिलकुल परिणाम व्हायचा नाही आणि तो त्याला काहीही प्रतिसाद पण द्यायचा नाही.....
त्याचा संवाद फक्त मामी शी म्हणजे माझ्या आईशी चालायचा तो फक्त तिच्याशी बोलायचा ....

"वयनी , उभा र्हाव का जाव?"....

म्हणजे थोडा भात वरती थोडी आमटी जराशी भाजी असं त्याला माझी आई रोज द्यायची. त्याला उंडी म्हणत. तर हा विचारायचा 
ती देतेस की मी जाऊ....!

म्हणजे एका भिक्षेकरीची भिक्षा मागण्याची ही पद्धत होती.....
ऐकणार्याला खुप विचीत्र वाटायचं...
यात विनंती बिलकुल नव्हती.......
उद्धटपणाही वाटू शकेल...
पण तसं नव्हतं....

उंडी देत असलीस तर थांबतो नाहीतर जातो.... 

असं साधं सोप तो त्याच्या पद्धतीने सांगायचा....

कधी कधी आमची एखादी काकू येऊन 
"अरे सख्या ,आज जेवाणाला वेळ आहे  अजून"
असं सांगायची 
याच्यावर परिणाम शून्य.... 
तो एकच म्हणायचा ....

"थोरलया वयनीस बोलाव"
( मामी घरात मोठी म्हणून थोरली वहिनी हे तिचं नाव)

मग मामी बाहेर यायची 

"अरे ,आज जेवण  व्हायला थोडा वेळ आहे.... तू बस....  झालं की सांगते...."

"हाँ .... ज्वान ज्वान जानार तरी खय ?"...
तो स्वतःशीच बोलायचा....

"अरे सख्या रोज कसली उंडी मागतोस"
माझे काका कधी कधी त्याला म्हणायचे.... 
त्याचा सख्यावर काहीही परिणाम होत नसायचा....
तो मुख्य म्हणजे कोणाकडेही लक्षच द्यायचा नाही आणि मामी त्याला उंडी दिल्याशिवाय जाउ द्यायची नाही....
हा रोजचा कार्यक्रम असायचा....

मामी,  तू याला रोजच उंडी का देतेस?

यावर ती म्हणायची ....

"अरे आपलं चांगलं वीस-पंचवीस माणसांचं भरलं घर आहे , दुकान आहे , गडी माणसं आहेत, दिवसा मागे काहीतरी अन्नदान करावं... हा भीक्षेकरी आपल्या दारी रोज येतो म्हणून अन्नदान तरी होतं ....आणि हा सखा, साधा माणूस नाहीये आता त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामुळे तो असं घरी घरी फिरून अन्न मागतो व त्याच्यावर गुजरण करतो...त्याच्या एक एक गोष्टी  सांगायच्या म्हटल्या तर दिवस नाही पुरणार.....
सांगीन कधीतरी....."

आता अशा कोणत्या गोष्टीं मामीला माहित होत्या व ती सांगणार होती......


क्रमशाः
पुढच्या भागात....

Saturday, 3 July 2021

सप्रे गुरुजी

*सप्रे गुरुजी*
पूर्ण प्राथमिक शाळा तळवडे नंबर 1 .या शाळेला आपलयाच गावातील लाभलेले हे मुख्याध्यापक .
आमची ही शाळा त्याकाळी १ ते  7 वी पर्यंत होती . मी याच शाळेतून 1971 साली सातवी पास झालो .

मला लाभलेले सप्रे गुरुजी यांनी आम्हाला 5 वी आणि 6 वी मध्ये शिकवल्याच आठवतं...

मंडळी त्या काळी एकच गुरुजी सगळे विषय शिकवायचे .त्यामुळे कोणताही विषय शिकवताना वेळेच बंधन नसायचं !!
सप्रे गुरुजींचे आवडते विषय इतिहास , भूगोल आणि सर्वात आवडता विषय गणित होता.
इतिहास त्यातील शिवाजी महाराजानी गनिमी काव्याने जिंकलेल्या लढाया ते इतक्या खुलवून सांगायचं की खूप मजा यायची ऐकायला.
पेशवाई , त्यातील माधवराव पेशवे यांच्यावरचा धडा शिकवणं चक्क दोन दिवस चालायचं . त्यातच आमची शाळा सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा असायची.
एकदा शाळेत गेल्यावर आमचं म्हणजे नीदान माझं तरी लक्ष शाळा सुटते कधी इकडेच  असायचं त्यमुळे गुरुजींनी सकाळी शिकवलेली कोणतीही गोष्ट संध्याकाळी फारशी आठवायची नाही ....

कधी कधी तेह विचारायचे ..
"हा ... सांगा... आपण कुठपर्यंत आली होतो... "
आणि हे काम उषा , पुष्पा ह्या हुषार मुली लगेचच सांगायच्या व बाकीच्यांची सुटका व्हायची ...
शेवटी माधवराव पेशवे यांनी आठ दहा वर्ष वय असताना संपूर्ण राज्य कसं सांभाळलं आणि तुम्ही काय करत आहात याची तुलना करून धडा संपायचा ....

भूगोल हा विषयही ते आवडीने शिकवायचे पंजाब मध्ये असणारी शेती ,  बंगालमध्ये चालणारी मासेमारी व त्यावर होणारी उवजीविका,  आसाम मध्ये असणारे चहाचे मळे  असं खूप काही ते एकदम समरस होऊन शिकवायचे 

पण प्रश्न विचारल्या नंतर आम्ही आसाम मध्ये मासेमारी बंगालमध्ये चहा असं सगळं घोळ करून सांगायचो ....
....
"अरे घरी गेल्यावर कधीतरी ते पुस्तक उघडा... वाचा जरा ...
नाहीतर फुल घालून पूजा करा त्याची !!"
हा त्यांचा डायलॉग असायचा ...
सगळ्यात आवडता विषय गणित ...
खूप चांगलं शिकवायचे .
वर्गातल्या मुलांनी उभं रहायचं , ते गणित घालणार आणि तोंडी हिशोब करून उत्तर लिहायची ही  (माझ्यासाठी त्रासदायक ) पद्धत होती.

अर्थात 10 पैकी  4 -5 बरोबर यायचे , पण त्यातील एक दोन तरी एकमेकाला खुणा करून , बोट दाखवून वगैरे जे जे शक्य असेल ते सर्व करून लिहिलेलं असायचं त्यामुळे सांग... 
" तू हे कसं केलेस ?"
ह्या गहन प्रश्नाचं उत्तर सांगता यायचं नाहीच पण आपण लिहिलेलं उत्तर बरोबर की चूक तेही समजायचं नाही.....
नंतर ते गणितं सोडवण्याच्या पद्धती /रीत  सांगायचे आणि उत्तरापेक्षा पद्धत बरोबर असेल तर उत्तर बरोबर येतंच अस म्हणायचे ...

तसं शाळेत काही अतिशय आवडीचे कार्यक्रम असायचे ..
प्रत्येक शनिवार शाळा सारवायची .
अतिशय आवडीचा कर्यक्रम ... कधीही न चुकवण्यासारखा ...

म्हणजे शाळेत गेल्यावर प्रार्थना झाली रे झाली की लगेचच ह्या सत्कृत्यासाठी इतर वेळी मागे असणारी मुलांची टोळी पुढे यायची . मग कुठून कुठून शेण जमवायचं , विहिरीवरून किंवा नदीतून पाणी आणायचं , झाडाचे टाळे घ्यायचे आणि शाळा सुटायची वेळ होऊन गेली तरी थांबून हे काम पूर्ण करायचं !
सगळं झाल्यावर गुरुजी शाबासकी द्यायचे , खूप छान वाटायचं आणि मुख्य म्हणजे या दिवशी कोणत्याही प्रकारचा अभ्यास नसायचा ...
 😀

असाच असणखी एक कर्यक्रम म्हणजे
दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन असायचं आणि रात्री मुलां मुलींचे नाच , गाणी , छोटी नाटकं  असायची. सर्व पालक आपल्या मुलांचे कर्यक्रम पहायला आवर्जून यायचे.
या मध्ये सप्रे गुरुजींचा सहभाग आवर्जून असायचा . ते रंगकर्मीच होते .
त्यांनी एक गाणं बसवलं होतं ...
" लाल टांगा घेऊन आला 
आला टांगेवाला ...
ऐक लाला गाणे गातो ला..ला...ला "
याला पचल येथील SVM शाळेत प्राथमिक शाळांच्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं होतं ....

सप्रे गुरुजींच्या घरी सातवीत असणाऱ्या आम्हा मुलांची रात्री शिकवणी चालायची .या करता कोणतंही शुल्क नव्हतं, केवळ रिझल्ट चांगला लागावा हा हेतू होता . 
आता असे सेवावृती शिक्षक लाभण शक्य नाही ...

त्यांच्या घरी पोस्ट ऑफिसही होत , तीही जवाबदारी गावच्या हितासाठी त्यांनी पार पडली होती .

मंडळी आपल्या दत्ताच्या उत्सवात कीर्तन करण्याचं महत्वाचं काम काही वर्षे त्यांनी केलं, ज्यावेळी
मंडळाची आर्थिक परस्थिती यथा तथाच होती ....
काही काळ आपण नाटकंही करीत होतो , त्यामध्ये अडलेल एखादं काम हक्काने गुरुजींना सांगावं व त्यांनी ते करावं असा प्रघातच होता ...
या वर्षीच्या उत्सवामध्ये , घरून  प्रसाद आणण्याची जी प्रथा आहे ती अकुलने सांभाळली होती. गुरुजींनीही त्या दिवशी प्रसाद आणला होता व हे दोघेही शेजारी शेजारी बसून काही वेळ गप्पा मारीत होते.
तीर्थ प्रसाद झाल्यावर मी , अनुजा , श्रेया आणि अकुल या सर्वांची त्यांच्याशी ओळख करुन दिली आणि आम्ही त्यांना नमस्कार केला ....

"ही तुझी मुलं ... 
काय करता तुम्ही .... "

नंतर अनुजाकडे पाहून

" हा एवढासा होता ....आता ...."

एवढं बोलून ते हसले ....

त्यांच्या चेहऱ्यावरून  काळ खूप झपाट्याने मागे पडत असल्याची जाणीव झाली ...

केवळ शिक्षकच नव्हे तर गावातील इतर जवाबदर्या तन्मयतेने पार पाडणाऱ्या सप्रे गुरुजींना माझा साष्टांग नमस्कार .

अनंत (नंदा ) प्रभुदेसाई
11 जून 2021

Wednesday, 28 April 2021

आम्ही साजरा केलेला गुढीपाडवा

*आम्ही साजरा केलेला गुढीपाडवा*

आज गुढीपाडवा !!
साडेतीन मुहूर्तांपैकी एक चांगला शुभ मुहूर्त ...

काही दिवसांपूर्वी ती त्या कंपनीमध्ये इमाने इतबारे नोकरी करीत होती .घरची परिस्थिती जेम तेम होती .तिच्या वडिलांच्या एका मित्राने एक मुलगा सुचवला व हीच लग्न झालं ...

काही दिवस गेले आणि साडेसाती सुरू झाली .नवरा हिचे सगळे पैसे काढून घ्यायचा , नीट वागायचा नाही आणि हिला divorce घेण्यासाठी तगादा लावला, व डीव्होरस झाला .
घरची परिस्थिती बिघडली , हिची नोकरी गेली व वडिलांना दारू च व्यसन लागलं ..
आई आणि ही हताश झाली , काहीही सुचेना ..कोणीही मदत करण्याला पुढे येईना ...

तिच्या ऑफुसमधील एका मैत्रिणीला ही सर्व स्टोरी माहीत होती , तिने यांच्यातून तिला हात द्यायचं ठरवल , पण ते सोपं थोडच होतं...
पहिल्याने एक वकिलांची ओळख काढून , तिच्याबरोबर कोर्टाच्या एक दोन हीअरिंग केल्या , तिला धीर दिला व डिओरस मिळवला , त्यातून तिची सूटका केली.
आता हिची नोकरी जाण्याचं कारण म्हणजे तीच कामात लक्ष नसणं अस दिल होतं.
मैत्रिणीने HR गाठलं , आपली ओळख पणाला लावली आणि कामावर का लक्ष लागत नव्हता ते त्यांच्या निदर्शनास आणून दिल !!

एक दिवस  मैत्रिणीला receptoinist ची जागा कम्पनिमध्ये आहे असं समजलं ...
हिने HR, accounts, personal सगळीकडे हिची केस लढवली आणि तिच कॉल लेटर  मिळवलं ...
अजूनही नशीब साथ देत नव्हतं . मैत्रीण स्वतःच करोना पोसिटीव्ह झाली आणि हाताशी आलेला घास जातो की काय अस झालं ...
मैत्रिणीचे 3-4 दिवस कोविड टेस्ट वगैरे मधे गेले , पण हाताशी लॅपटॉप , मोबाईल फोन आणि जिद्द होतीच हिला काहीही करून नोकरीला लावायचच....

मधल्या काही वेळात मैत्रिणीचे आई वडीलही पोसिटीव्ह झाले , त्यांच्या टेस्ट , औषधे हीन manage केलं ...

काल सोमवार तारीख 12 एप्रिल 2021 , हिचा interwiew कम्पनी मध्ये झाला , मैत्रीण सकाळपासुन लॅपटॉप वर कॉन्टॅक्ट मध्ये होती.
आणि संध्याकाळी हिच्या हातात अपॉइंटमेंट लेटर मिळालं ...
आज 13 तारीख 2021 गुढीपाडवा , आम्ही तो कालच साजरा केला , एक घरात छोटीशी पणती पुन्हा लावून !!!

तीच नाव काही कारणास्तव अत्ता सांगता येत नाही .

मदत करणाऱ्या मैत्रिणीच नाव  :
*श्रेया प्रभुदेसाई*

माई मावशी !!

माई मावशी !!
आज पुढच्या प्रवासाला निघून गेली ....
मावशीच्या काही खास गोष्टी होत्या ...
तिने मला क्यारम खेळायला  शिकवलं !
रात्री उशिरा पर्यंत आम्ही दोघ carrom खेळायचो.  अलिखित नियम म्हणजे शेवट नेहमी मावशीने जिंकल्यावरच व्हायचा , भले रात्रीचे 2  2.30 वाजले तरीसुद्धा ....
मावशीची कौतुक करण्याची पद्धत पण वेगळी होती ....
श्रेयाला 10 वी ला कमी मार्क्स होते आणि तिला कोणत्या साईडला पाठवाव या संभ्रमात आम्ही होतं ....

मावशी ने सांगितलं माझं ऐकायचं असेल तर सांगते तिला चांगल्या कॉलेजला टाक ......
प्रभुदेसायांची लेक आहे ती 
....पडेल ....अडखळेल ..पण उभी राहीलच ...

ताई , शोभाताई , मंदा ह्या तर तिने आणि भाऊंनी दिलेल्या आधारामुळेच पारल्यात राहू शकल्या , शिक्षण पूर्ण करू शकल्या.

आमच्या बाबतीत मामी स्वर्गवासी झाल्यावरचा ती आधार होती . पारल्याला गेल्यावर तिच्याकडे हक्कच चहा पाणी वसूल केल्याशिवाय बर वाटायचं नाही !!

खुप आठवणी आहेत .

भारती , विवेक , मेधा 
शिरुषजी , सतिशजी , मेधा वहिनी आणि सर्वांनी एकमेकाला आधार द्या . ईश्वरी ईच्छा प्रमाण मानून  तुम्हा सर्वांना तोच आधार देईल याविषयी खात्री वाटते .

नंदा .

Sunday, 7 March 2021

भूत-भुताटकी-चकवा

*भूत-भुताटकी-चकवा*

गावात भूत भताटकीच्या गोष्टी आपण खूप ऐकतो. काहींचा प्रत्यय आपणाला आजही येतो...
अस म्हणतात या भुता खेतांच्या गोष्टींची सत्यता आपण शक्यतो तपासून पाहू नये !!!

तर मी ही ऐकलेली ही गोष्ट ....

मंडळी ही गोष्ट ज्यावेळी फक्त बैलगाडीने राजापूरहून दुकानाचा माल आणला जात होता त्याकाळातील आहे .(साधारणपणे 100 -१५0 वर्षापर्वीची)
राजापूरहून माल घेऊन संध्याकाळी निघालेल्या बैलगाड्या सकाळी पाचल , तळवड्याला पोचायच्या , जर वाटेत काही अडचण आली नाही तर ...
अजूनही आपण पाहू शकतो सौंदळ पासून राजापूरला जायचा बैलगाडीसाठीचा रस्ता वेगळा आहे. सध्याच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने हा रस्ता जातो.

इथे एक शंकराचं देऊळ ही आहे .सौंदळ तस मुस्लिम वस्तीच गाव असलं तरी सुद्धा शंकराचं मंदिर पूर्वी पासून आहे .

राजापूरहून माल घेऊन निघालेल्या बैलगाड्यांना नदीच पात्र पार करून , मोठा चढाव चढून वर यावं लागायचं . चढ चढून मालाने भरलेली गाडी, पहिल्या फटक्यात (प्रयत्नात ) जो गाडीवान वर आणेल तो खरा गाडीवान अस मानलं जायचं त्याकाळी ....

त्याला कारणही तशीच होती ....

एकतर राजापुरपासून भरलेली गाडी इथे येईपर्यंत बैल थकून जायचे , आणि रात्रीचे 1 , 2 वाजायचे . डोळ्यात बोट घातल तरी समजणार नाही असं मिट्ट काळोख असायचा. नदीच्या पात्रातून वरती चढण्याचा चढवाचेच चार रस्ते होते, एक रस्त्यावरुन थोडं मागे जायचं व एक वळण घेतलं की आपला पाचल तळवड्याचा  रस्ता दिसायचा , दुसरा रस्ता तुम्ही पकडलात व वर आलात की तुमच्या लकशात यायचं तुमचा रस्ता चुकलाय व तुम्ही उलट बाजूला आलाय, आणखी एक रस्ता सौंदळ गावात जायचा आणि चौथा आणि शेवटचा तुळसवडे ह्या गावात जायचा .

नदीचं पात्र पार झालं की ह्या रस्त्याला लागण्यापूर्वी एक प्रथा होती त्याकाळी .....

गाडीवानाने इथे पोचल्यावर गाडीतून उतरायचं आणि कुकारा (हाक) मारायचा व
" गाड़ी वर येऊ दे काय ?" अस विचारायचं !!

त्या भयाण रात्री सुद्धा आपण मारलेल्या कुकाऱ्याला उत्तर म्हणून दुसरा कुकारा ऐकू यायचा..

मंडळी , प्रथेप्रमाणे जर तूम्ही साद दिली नाही आणि प्रतिसाद येण्यापूर्वीच पुढे आलात तर ...

भाद्रपद महिना होता आणि आमची गाडी राजापूरहून माल भरून निघाली होती.गाडीत भाऊ आणि गाडीवान तुकाराम हातणकर होते. 
कधी नाही तो तुकारामांचा डोळा लागला .....
आणि नेहमीच्या सवइ प्रमाणे बैलांनी घरचा रस्ता बरोबर पकडला . गाडी नदीतून वर आली आणि अर्ध्या रस्त्यात बैल उभे राहिले आणि पुढे जाईनात....

तुकारामाने हर प्रयत्न केले पण बैल जागा सोडेंनात....
शेवटी तो गाडीतून खाली उतरला आणि दहा पावलं चालत पुढे गेला आणि  ......  
त्याला दरदरून घाम फुटला....
धावत धावत येऊन त्याने भाऊंना उठवलं , पण पुढे काही त्याच्या तोंडून नीट शब्दच येईनात....

भाऊंना काय झालं याची थोडीफार कल्पना आली होती ....

भाऊंनी तुकारामाला

 "गाडी मी परत येईपर्यंत इथून हलवू नकोस आणि काही झालं तरी तू गाडीतून खाली उतरू नकोस " अस सांगितलं
आणि त्याही परिस्थितीत त्यांनी त्या देवळाचा रस्ता धरला ... 

दुसऱ्या दिवशी घरी अनंताची पूजा होती व भाऊ पूजेला बसणार होते.

भाऊ शंकराच्या देवळात आले , नमस्कार केला , 
" उद्या अनंताची पूजा आहे , चूक -भूल पदरात घे , आणि गाडीला रस्ता दाखव " 
अस सांगून नमस्कार केला ...

आणि देवळातून बाहेर पडले  मात्र .....

देवळाच्या मागच्या बाजूनं डोक्यावर घोंगडी घेतलेला  एक रांगडा गडी जाताना म्हणाला .....

" पूजा हाय म्हणून तूला आज सोडलंय...... 
मला साद (हाक) का नाय दिली....
जा आता गुमान......"

ती बघ गाडी आणलीय मी वर ....

आश्चर्य म्हणजे खरोखरच गाडी देवळा समोर उभी होती ....

आणि तुकाराम 

"लय येळ (वेळ) लाऊ नका शेट...  येळत जया हवं "
असं भाऊंनाच सांगत होता ...."

मंडळी रस्त्यात तुकारामाने अस काय पाहिलं ....

नंतर हे लोक घरी आले , पूजा झाली ..

दोन तीन दिवसांनी तुकारामाला राजापूरहून येताना त्या दिवशी काय झालं होत म्हणून विचारलं तर....

दोन दिवसांपूर्वी रस्त्यात गाडी अडली होती , त्याने भाऊंना उठवलं होतं.
इथपर्यंत त्याला सांगता येत होतं .... 

नंतर एकदम ....

"शेट रातच्या वक्ताला कालोखातून देवलात कशापायी गेले , अन आले हे बरी माझ्या   धेनात आजूनबी नाय आलं ....."
असं तो म्हणत होता ...
   
काय झालं होतं तर गाडीतून खाली उतरल्यावर रस्त्यात मधोमध दोन चुली पेटलेल्या व बाजूला घोंगडी पांघरून हातात एक मोठी काठी घेऊन बसलेली एक माणसासरखीच विचित्र अशी आकृती  त्यानं पहिली होती ......
रात्रीची वेळ असल्यामुळे तो घाबरला होता ....भीती वाटण्यासारखच ते सगळं होतं ....

नंतर भाऊनीही ते सर्व  बघितल .....
थोडं त्यांच्याही मनात चर्रर्रर्र झालं ...
पण थोडा धीर दाखवून त्यानी देवळात जायचा निर्णय घेतला होता ...


तर अशीही भुताटकी , चकवा... 
याचा अनुभव ज्यांना येतो त्या काही जणांनाच त्या विषयी नंतर सांगता येत.
खूप जण तंद्रीतच सर्व करतात जे त्यांना नंतर सांगताच येत नाही...

तळवड्याला आमच्या घरी , जवळच असलेल्या तेलंब्यावरच भूत , त्याच लसणीच तिखट व तेलासाठी मृग नक्षत्राच्या सुरवातीला रडणं , मांडवकराचा फणस (त्याने लावलेलं फणसाचा झाड )
या सर्वांची घरात काही विशेष असेल तर  आजही आठवण ठेवावी लागते  , करावी लागते केली जाते.... 

वीसरलात तर .....


याविषयी पुन्हा कधितरी ....


अनंत (नंदा ) प्रभुदेसाई
07 मार्च 2021

Monday, 15 June 2020

सह्याद्रीची लेक - अरुणा वायकुळ

*सह्याद्रीची लेक - अरुणा   वायकुळ*

ते वर्ष होतं1972-73  च. पाचल च्या सरस्वती विद्या मंदिर च्या मैदानावावर रात्रीच्या वेळी मोठी लगबग दिसत होती . सर्व व्हॅलीनटीयर्स म्हणजे  गांधीसर, शशी सक्रे, अरुण साबळे अशा सर्वांनी  कबड्डीच ग्राउंड तयार केलं होत.
कारण उद्या येथे एक प्रसिद्ध कबड्डी चा सामना रंगणार होता.त्याच atraction म्हणजे पहिल्यानेच (त्याकाळी ) मुलींचा कबड्डीचा सामना होणार होता. 

सरस्वती विद्या मंदिर विरुद्ध इतर सर्व शाळा. 
मंडळी लक्षात घ्या एका शाळेच्या टीम विरुद्ध इतर सर्व शाळांमधील कसलेले खेळाडू . 
हा सामना SVMच्या  ग्राउंडवर खेळला जाणार होता . गांघी सरांनी त्यांचं कौशल्य पणाला लावून टीम तयार केली होती . प्रत्येक खेळाडू कडून कसून प्रॅक्टिस  म्हणजे सर्व्हिस मध्ये कोपरा कसा मारायचा , पकड करण्यासाठी दुसऱ्या बाजूने खेळाडूनी घेरल्यावर  हाय जंप घेऊन किंवा बगल देऊन मध्य रेषा कशी गाठायची अश्या खूप प्रकारच्या tacties अगदी कसून करून घेतल्या होत्या .

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 9.30 वाजता सम्पूर्ण ग्राउंड प्रेक्षक व मुलांनी भरून गेलं. आम्ही सर्व SVM ची मुलं   एकदम शिस्तीत ग्राऊंडच्या दोन बाजूना उभे होतो .

सर्व प्रथम rest of the school ची टीम ग्राउंडवर येऊ लागली. त्यानी निळ्या रंगाच्या पॅन्ट व आकशी रंगाचे 
T. Shirt घातले होतें. 
Captain ने संथ लयीत धावत पहिल्याने ग्राऊंडला नमस्कार केला व तिच्या मागोमाग सर्वांनी तिचच अनुकरण करीत ग्राऊंडला दोन फेऱ्या मारल्या व आपल्या position घेतल्या. 
नंतर मोडक सर , त्यांचे कोच आले व त्यांनी एक कटाक्ष मैदानावर टाकला. 
तरबेज व कसलेल्या कोचची नजर होती ती...
कॅप्टनच्या कानात त्यानी झटकन निर्णय सांगितला taaus जिंकला तर काय आणि हरला तर काय ...

आता SVM ची टीम . आमचा ड्रेस  खाकी पॅन्ट व व्हाइट T shirt .
प्रथम कॅप्टन अरुणा वायकुळ हिने ग्राऊंडला नमस्कार केला व सम्पर्ण टीम मध्य रेषेजवळ येऊन उभी राहिली .
दोन्ही कॅप्टन taaus करण्यासाठी पुढे आले. अरुणाने सर्वप्रथम त्यांच्या कॅप्टनला शेक हँड केला व तिला आणि तिच्या टीमला best of luck दिल व आपल्यातील खिलाडू वृत्तीच दर्शन घडवलं . 

Taaus त्यांनी जिंकला आणि SVM  च मन थोडं नाराज झालं .
खेळाला सुरवात झाली.
ROS (rest of school  team) च्या तीन नंबरने sevice केली  व परतली.
आता SVM च्या कुंदाने सर्व्हिस करण्यासाठी त्यांच्या तीन नंबरच्या खेळाडूचा पाठलाग केला , एकदम डीप कोपरा घेऊन पहिला पॉईंट SVM ला मिळवून दिला.
आता ROS च्या कॅप्टनने इतक्या झटकन सर्विस केली व दोन्ही कोपरे न घेता SVM च्या टीमवर मधोमध अटॅक करून तीन गडी बाद केले. 

सुशिला सर्व्हिस करून माघारी आली. 

आमचे 4 गडी आणि त्यांचा अटॅक . 

6 नंबरची सर्विस. डीप कोपरा , हाताने अरुणाचा थांबायचा सुशीलाला इशारा ... मधल्या छायाचा हात तिने सोडला....आणि चित्याच्या चपळाईने छायाने तिची तंगडी पकडली ...बस एकच हुर्यो झाली .
SVMच्या चित्रा हिला जीवदान मिळालं.

चित्रानेच सर्विस केली व परतली.

त्यांच्या 4 नंबरची सर्विस , मध्ये अटॅक .... फास्ट उजवा कोपरा... मध्ये गडी टिपण्याचा प्रयत्न.... डीप डावा कोपरा ... ओह .... हे काय झालं .... ...
SVM ची पकड चुकली आणि पुन्हा 4 गडी बाद. 

आता आमच्या शेवटच्या खेळाडूला सर्विस साठी  डीप घुसून पॉईंट मिकवण्या शिवाय पर्याय नव्हता . 

पण तिची पकड त्यांनी केली व आम्ही पहिला लोण घेतला व मध्यंतरसाठी खेळ थांबला.

5 मिनिटांतच पुन्हा खेळ सुरू होणार. कोच नि आपापल्या टीमला मर्गदर्शन केलं आणि अंपायर नी शिटी वाजवून खेळला सुरवात झाली.

SVM  6 गुणांनी मागे .

ROS ने सर्विस करुन परतणार इतक्यात छायाने तिचा पाठलाग केला... तिला टच करून रिटर्न होतोय अस भासवून पुन्हा एकदम आत घुसून आणखी एकीला टिपलं.
5 नंबरच्या खेळाडूला टच लाईन च्या जरापुढे येताच अस काय उचललं की ती ग्राऊंडच्या बाहेरच गेली.

आता अरुणा सर्विस ला गेली ....

डीप कोपरा ....दुसऱ्या बाजूला चपळाईने जाण्याची हूल ... आणि ... कोपर्यातल्या खेळाडूला टच करताच तिने व तिच्या बाजूची ने  पकड करण्याचा प्रयत्न  व दोन पॉईंट वसूल.

ROS च्या कॅप्टनची सर्विस ... SVM च्या दोन्ही कोपरयातिल खेळाडूंनी नजरा नजर केली , इशारा पक्का ....
आणि ...आणि तिला उचललंच ...

पुन्हा अरुणाचीच सर्विस ...मध्ये अटॅक ...आणि दोन्ही टोकाच्या मुलींनी एकदम पकड करण्यासाठी घेरलं आणि ... क्षणात जंप घेऊन तीने मध्य रेषा गाठली. ROS चे चार खेळाडू आउट.

आता राहिलेल्या दोघीपैकी एक जण साधी सर्विस करून परत.

छायाची सर्विस  .... दोघींनाही टीपायचंच ...
एका पोऱ्यात डीप अटॅक ... टच ...दुसरी पाय पकडण्यासाठी मागून आली ..... तर तीलाच दोन पायांच्या मधून मागे ढकलून मध्य लाईन टच .

ROS वर  लोण.

दोन्ही संघ समान गुण.
8 च मिनिटं बाकी. 
ROS च्या कॅप्टनची सर्विस .... टाइम पास....पुनः डीप डावा कोपरा ..... सुशीलाचा पकड करण्याचा प्रयत्न ... फसला ....2पॉईंट मिळाले.

SVM कडून छायाची सर्विस ....त्यांचा पकड करण्याचा इरादा ... डीप डाव्या बाजूने दुसऱ्या बाजूला येताना ,मधल्या खेळाडूने डाव साधला ...

3 गुणांची आघाडी ROS कडे. व शेवटची 4 मिनिटं बाकी . 

साधी सर्विस करून त्यांची खेळाडू परत. 

Do or die
अरुणा सर्विस मधेच पॉइंट घेणार हे निश्चित . 
कोपऱ्यात पायाने टच , बाजूचीला हातानें ..... आणि....दुसऱ्या बाजूने पकड करायला येणाऱ्या दोघींच्या वरून जंप घेऊन डायरेक्ट मध्य रेषा.

आणि सामना संपल्याची शिटी वाजली . 

SVM ने सामना जिंकला होता.

सामना जिंकणं महत्वाचं ,किती गुणांनी जिंकला याला महत्व नाही. जस दोन्ही संघ मातब्बर असतील तरच खेळांची मजा अनुभवता येते. 

मंडळी अरुणा वायकुळ ही SVM ला लाभलेली अतिशय गुणी खेळाडू. हिने लॉंग जम्प , हाय जंप 
रनीग , कबड्डी या सर्व प्रकरांमध्ये आपल्या शाळेचं नुसतं प्रतिनिधित्वच नाही केलं तर शाळेचं नावही उज्वल केलं . 
आंतर शालेय, तालुका , जिल्हा , राज्य स्तरीय लेव्हलला खेळून शाळेला सन्मान मिळऊन देणारी रकमेव खेळाडू. 

हिचा कबड्डीचा खेळ व पकड करण्याचं कौशल्य बघून बारामतीमध्ये सत्कार करताना श्री. शरद पवार त्यांच्या मिस्कील भाषेत म्हणतात ...
'या कडे कपारीतिल सह्याद्रीच्या  हिरकणीची पकड म्हणजे चक्क गुळाला जसा मुंगळा चीकटतो ना तशी असते, एकदा का तंगडी पकडली की बस ....सुटका फक्त शिटी वाजल्यावरच "

त्रिवेंद्रमला उंच उडीसाठी हिची निवड झाली , पण पवार साहेबांच्या भाषेत बोलायचं झालं तर ह्या वाघिणीच्या पायात साधे बुटसुद्धा नव्हते .

मंडळी तो काळ आठवा, त्यावेळी अकरावी एस एस सी ची परीक्षा द्यायला आपल्याला राजपुरला जाव लागायच .कारण आपली शाळा SSC Center नव्हती.
तर अशा खडतर परस्थितीतसुद्धा जिने शाळेला राज्यस्तरीय सन्मान मिळवून दिला त्या अरुणाला , त्या सह्याद्रीच्या लेकीला आम्ही सलाम करतोय!!

*अनंत प्रभुदेसाई*

Friday, 10 April 2020

माझी घर खरेदी..... भाग ३ ..

माझी घर खरेदी..... भाग  ३ ...

अनुभव - शब्दांकन 

नंदा प्रभुदेसाई 

एक दिवस अनुजाला ऑफीसमधून यायला थोडा उशीर झाला म्हणून तिला सोडायला तिचे बॉस आले होते घरी . तेही ठाण्यातच रहात होते . माझी त्यांच्याशी ओळख करून दिल्यावर ते म्हणाले तुमचं HDFC च जे लोन आहे ते परत करण्यापेक्षा हे घर विका आणि चांगल्या ठिकाणी दुसरं घ्या !!!

त्यांना काय सांगणार माझी कहाणी!!! 

ठाण्यामधला चांगला एरिया म्हणजे भास्कर कौलनी, चांगली शाळा सरस्वती, खरेदीचं चांगलं
ठिकाण गोखले रोड - नौपाडा . आपण इकडे जगा घेऊया का  ??? .......... मी !

वेड लागलंय का ... इतर लोक काहीही सांगतील , आता आधी आपल्या मुलीला चांगल्या शाळेत घालू ,मग नंतर सगळं ..

एक दिवस फिरत फिरत भास्कर कौलनी मध्ये आलो व एका बील्डिंगच बांधकाम चाललं होतं ते पाहायला म्हणून थांबलो.
चौकशी केल्यावर बरेचसे फ्लॅट बुक झाले असले तरी 4, 5 खाली आहेत  अशी माहिती मिळाली. रेट   रू.1000 psf. 1bhk  Rs.6.50 lakhs ....
नाही जमायचं आपल्याला ....

सध्याच्या घराचे 3.50 L तरी मिळाले पाहिजे व 3L लोन असं झालं तर .... ...

आमच्या घराला एका agent ने पार्टी आणली . ते NRI वाले होते . त्यांनी सर्व पैसे  एकदम देऊ पण किंमत 2.50 लाख व घराचा ताबा लगेचच पाहिजे अशा अटी घातल्या. ...

विचारचक्र सुरू झालं. पुन्हा रात्री झोप नाही. आता आम्ही दोन , एक छोटी मुलगी आणि आतापर्यंतचा विदारक अनुभव ....

.......  आणि आम्ही त्या पार्टीला रहाती जागा एका पोरीला हातातोंडाशी पकडून विकून टाकली . .....

त्यांच्या अटी ची जाणीव म्हणजे ताबा लगेचच द्यायचा मी कबूल करून बसलो . 

"आधी पैसे तर देऊ देत मग बघु ... वाटलं इतकं का सोपं आहे ते......"

माझा अंदाज इथेच साफ चुकला आणि ठरलेली रक्कम त्यांनी माझ्या bankमध्ये जमा केली, उरलेली हातात दिली , आणि आज शनिवार आहे , उद्या आम्हाला घराची किल्ली पाहिजे , आज रात्री आमचे वडील इथेच तुमच्याबरोबर रहातील .(पैसे घेऊन आम्ही पळालो तर )अस सांगितल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली.....


आता काय करायचं , कुणाला सांगायच ? आणि ह्या छोट्या मुलीच कसं होणार ? ...


पहिल्यांदा भास्कर कॅलिनीतील त्या बिल्डरला गाठलं , यावेळी दादा बरोबर होता, शेवटचे 2 ब्लॉक बाकी होते , त्याने कींमत 7 लाख सांगितली आणि मी हुज्जत घालायला सुरुवात केली .... 

"तुम्ही पहिल्याने 6.50 सांगितले होते व मला जास्त किंमत का सांगता ? मला जागा घ्यायची आहे !! "

" वो तो जमानेकीं बात हो गयी , यकीन करो कल ही मैने 5 वा माले का फ्लॅट यही भाव से बेचा है !"

"कितने मे बेचा है " 

" जो भाव तुमको बोला वही , हम मारवाडी है , जबानके सच्चे राहते है "

" चलो जो भाव पे आपने 5 वा माले से लिया वही मुझे लगा दिजीए "

आमची जुगल बंदी ऐकून दादा म्हणाला मी घरी जाऊ का ? तू काय यांच्या नादाला लगतोस ...
तस सुद्धा दादा चा एकंदरीत स्वभाव , त्याच ते मितभाषी पण या तत्वात माझं हे बोलणं म्हणजे त्याने तिथे थांबणं मुश्किलच होत.

मी पुन्हा एकदा त्यांना म्हटलं 

"हे 10000 घ्या आणि मला त्या 5व्या मजल्यावरच्या चा रेट लावा ."


" 7 लाख में कम नही होगा,  जबान की कोई इज्जत तो करो "
" आपने 5 वा माले का फ्लॅट 1000 रुपये के भाव मे बेचा है और वो भी कल"  मी जोरात टेबलावर हात आपटून सांगितलं 
" आपके पास क्या सबुत है , जो भाव उसको वही अपको मीलेगा, जाओ पैसा नही तो  ब्लॉक खरीदनेके लिये आते ही क्यू  ?? "

.....  आणि मी त्याला शब्दात पकडलं , दादाला तिथेच थांबवून स्कूटर वरून 10 मिनिटात बाळा च्या घरी गेलो , त्याला सगळं सांगितल,  तू फक्त तुझा रेट त्याला सांगायचा ... बस माझी जागा पण बुक होतेय ...


कारण 1000 च्या रेटने बाळाने जागा बुक केल्याचे मला सांगितल होत.

जस त्या बिल्डरने बाळा आणि मला पाहिल तस त्याचा चेहरा एकदम उतरला ..... जबानीची सच्चाइ उघडी पडली आणि माझी , 8 व्या मजल्यावरची जागा रु.1000 च्याच रेटने बुक झाली .....  !

हुष्य !!! अजून लढाई संपली नव्हती तर आता कुठे सुरू झाली होती....

ज्या agent ने आमची सध्याची जागा विकली होती त्याला गाठलं व मला 6 महिन्यांनसाठी रहायला भाड्याची जागा पाहिजे व ती सुद्धा आजच, भाडं जास्त चालेल, deposit चे पैसे खिशात घेऊन आलोय,  अग्रीमेंट नंतर करा आधी जागा द्या ! असं सांगितलं.  इकडे उद्या संध्याकाळी ह्या माणसाला किल्ली द्यायची होती म्हणजे मी अनुजा व पोरगी घराबाहेर , कारण तसच ठरलं होतं!!!

सद्गुरू मधला एक टेम्पो भाड्याने घेतला , घरच सामान दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर न्यायचं आहे म्हणून आत्ताच टेम्पोत भरा म्हणून सांगितलं.
चौकशी करून दिवसाला  कमीत कमी 500 रुपयांचा धंदा टेम्पो मालक करतो याची माहिती घेऊन ठेवली होती. 
अजूनही भाड्याची जागा मिळाली नव्हती ,म्हणजेच वेळ आली तर दिवसाला 500 रुपये देऊन सामान टेम्पोतच ठेवायचं याची तयारी केली होती.

Agent ने मित्राचीच जागा आहे,  भाडं 3000 व deposit 15000 सांगितलं .  " भाडं 4000आणि Deposit 20000 मी देईन "  पण जागा उद्या सकाळी ताब्यात पाहिजे , अग्रीमेंट करा किंवा नका करू कारण मला 6 महिन्यांसाठीच भाड्याची जागा पाहिजे , माझी नवीन जागा भास्कर कॉलनी , वर्धमान टॉवर या बिल्डींग मध्ये मला 4 महिन्यातच मिळणार आहे अस सांगितलं ....

 Agent ने त्याच्या पद्धतीने  मी सांगितलेलं सर्व चेक करून मला भाड्याच्या जागेची किल्ली देऊन टाकली.

घरी हा म्हातारा माणूस व आम्ही त्या रात्री राहिलो , सकाळी उठल्यावर चहा पाणी झालं ...

"काका , ठरल्याप्रमाणे ही किल्ली तुमच्या ताब्यात घ्या , आज संध्याकाळ पर्यंत सामान शिफ्ट करीन ...... जे इथे राहील ते तुमचं...व जे नेलं ते माझं "


"अहो तुम्ही कुठेही रहाल पण ह्या छोट्या मुलीच काय कराल ?" 

एक काम करा , दुसरी जागा बघा , तुमचं सामान 4- 5 दिवसात शिफ्ट करा व नंतर हे घर आमच्या ताब्यात द्या , ही घ्या किल्ली , जरा ह्या मुलीचा विचार करा ,  फॅमिली वाले आहेत ना तुम्ही ...... त्या आजोबांची खात्री पटली की त्यांना कोणत्याही परिस्थितीत मी जागा  देईनच...

मंडळी 4 च महिने भाड्याच्या घरात राहिलो , अतोनात हाल व्हायचे , विकत ची पोळी भाजी खायची , मुलीला सकूटरवरून न्यायचं , आणायचं आणि काय काय केलं ....


एकदा असच ही जागा बघायला आम्ही दोघ गेलो होतो , त्यावेळी अनुजा ने ओट्या साठी काहीतरी change सांगितला तर तो  बिल्डर म्हणाला , 
 
" ये तो शादिके पाहिलेही बच्चेकी बात हो गयी , पहिला सब पैसे लाव बादमे देखेंगे "

इथे एक फार महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे अनुजाच्या ऑफिसच loan फारच लवकर व एकदम कमी कष्ट करून मिळालं , नंतर तर त्यांनी स्टॅम्प duty चे ही पैसे दिले .

ठाण्याच्या ज्या भागात जागा सोडा पण कधी नुसतं बघायला तरी येइन अस स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तिथं रहायला आलो.....

नंतर दादानेही याच बिल्डींगमध्ये मोठी जागा घेतली.

अजूनही मी इथेच राहतो आहे. सर्व सोयीं इथे आहेत त्यामुळे आता तरी जागा बदलणार नाही . 

हा प्रवास सांगण्याचा हेतू इतकाच मी फार काही मोठं केलं अस माझं म्हणणं बिलकुल नाही. आलेल्या अडचणीतून जस सुचलं तसे मार्ग काढले , कदाचित यापेक्षाही सोपा मार्ग होता किंवा असेल , पण  मला तो नाही सुचला .....

माझ्या मुळे अनुजा , तिचे आई बाबा , माझी व तिची  बहिणी भावंड कधी कधी इतके घाबरून जायचे की बस ..... 


पण माझ्यापुढे तरी दुसरा पर्याय काय होता ....


यातून कुणाला प्रेरणा मिळाली तर अतिशय आनंद होईल ....

जेव्हा जेव्हा 7 नंबर मधील आम्ही सर्व 15 ऑगस्टच्या ट्रीपला जातो तेव्हा  "तू विरारची जागा कशी विकलीस, ठाण्याला कसा आलास आणि त्या टेम्पोतच रात्रभर सामान ठेऊन पुढे काय केलंस " ते जरा सांग बघू आम्हाला.... अस म्हणतात .


आणि शेवटी आम्ही तुम्हाला " उपरे"  म्हणालो म्हणून तुम्ही ब्लॉक घेतलेत नाहीतर राहिले असतात आमच्यासारखे अस म्हणून .....


चियर्स.....  !!

यानंतर मी घोडबंदर ह्या नवीन develop होत असलेल्या भागात दोन छोटी छोटी शॉप्स घेऊन तीही इच्छा पूर्ण केली. 

बघू पुढे काय मार्ग दिसतो ते......

.......  समाप्त ......

............ नंदा .......